Posts

निसर्ग आपला सखा

Image
निसर्गासारखा मित्र शोधुन सापडणार नाही. जसं मित्र सोबतीला असतील तर माणूस अगदी बिंदास असतो, आनंदी असतो कसली चिंता नसते ना कशाची फिकीर असते. जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे मित्रांचा सहवास असतो. त्यातल्या त्यात मित्रांसमवेत निसर्गाचे सान्निध्य लाभणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती घेण्यासारखे आहे. तो स्वर्गिय अनुभव आज आम्ही मित्रांनी घेतला. जागतिक महामारी कोरोनामुळे बहुतेक अॉफिसनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आणि बऱ्याच दिवसानंतर विविध शहरांत कामानिमित्त विखुरलेले मित्र गावातील कट्ट्यावर जमले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग कुठेतरी बाहेर जाऊया असा प्लॅन ठरला. पण तो प्रत्यक्षात आणायला अनेक अठवडे खर्ची पडले. शेवटी काल ठरले की उद्या सकाळी जायचेच. मग ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठून फोन करायला सुरुवात झाली. त्यात दोन-तीन जणांनी टांग दिली आणि परत एकदा प्लॅन कॅन्सल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण इरादा पक्का होता म्हणुन "दो से भले चार" म्हणत अविनाश,मी आणि अलीम आम्ही तिघांनी गाड्या रस्त्यावर काढल्या पुढे जवळ्यात हरी केव्हाच आमची वाट बघत बसला होता. त्याला घेऊन  अखेर मा

बीडचा गर्दीतला कोरोना प्रवास

बीड शहर दहा दिवस बंद राहणार असल्याने मित्र योगेश नरवडे यांच्यासोबत मी आज कृषी दुकानाचा माल खरेदी करण्यासाठी शहराकडे निघालो होतो. शहराच्या जवळ आलोच ह़ोतो की पावसाने चाल केली. तांड्यावर चिलट्या (भुरभुर) पाऊस सुरू झाल्याने गाडी मागे वळुन निवारा शोधण्याचा अंदाज लागताच मी पुढे उड्डाण पुलाखाली थांबता येईल म्हणुन गाडी तशीच दामटायला लावली. शे-दोनशे मिटर पुढे आलो की लगेच पाऊस बंद झाला. कदाचित त्याला शहरात जाणाऱ्या माणसांना भीजवण्यात आनंद वाटत असावा. तसेही आजकाल मुद्दामहून कोणी पावसात मनसोक्त भिजताना दिसत नाही. म्हणुन हा निसर्गाचा प्रयत्न असावा. असो. शहरात प्रवेश करताच मोंढ्याकडे जाणाऱ्या खोदुन ठेवलेल्या रस्त्यातील छोट्या-छोट्या स्विमींग पुलातून रस्ता शोधत आणि आपल्याच देशातील मातीचा सुगंधित चिखल श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर राधा-कृष्णाने रंगपंचमी खेळावी तशी पण एकमेकांच्या अंगावर जाऊन नस्ती भांडणं होणार नाही अशा रीतीने उडवत निघालो होतो. पुढे वाहनं ऊभी दिसताच शहर बंद राहणार म्हणुन आज गर्दी थोडी जास्तच असावी असे मनातल्या मनात ठरवत मुंगीच्या पावलांनी पुढे सरकलो तर एक महापुरुष भर रस्त्यावर बं

काम की बात

साधारण एक अठवड्या पुर्वीची गोष्ट आहे. राम मंदिराचे भूमिपूजन होणार म्हणुन सर्वजण उत्साहात होते. ( त्या सर्वात मी पण येतो हे वेगळे सांगायला नको) पण देशातील अनेक रूग्ण कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे व अपुऱ्या वैद्यकीय सेवा- साधनांमुळे  उपचाराअभावी मरण पावत असताना मंदिराचे उद्घाटन करण्यापेक्षा एखाद्या मोठ्या सर्व सोयीयुक्त हॉस्पिटलचे उद्घाटन करणे अपेक्षित होते. (फक्त अपेक्षित होते म्हणतोय मी) असे मी सहजच माझ्या मित्राशी बोलताना म्हणालो.  मित्र तसा थोडा शिक्षीत (थोडाच हा, जास्त नाही) आणि व्यवहारीक दृष्टीने देखील हुशार होता (हा माझा गैरसमज होता) पण त्याने बोलताना सांगायला सुरुवात केली की, बरं झालं राम मंदिराचे भूमिपूजन झाले. कित्येक वर्षांपासून प्रलंबित मुद्दा निकाली लागत आहे (खरंतर आणखी खुप वेळ आहे, दोन टर्मच्या निवडणुका त्यावर पार पडतील) आणि तसेही देशात दवाखान्यांची काही कमी नाही, याचे उदाहरण देताना त्याने गावातील क्लिनीक व शहरातील खाजगी दवाखान्याचे उदाहरण दिले. अर्थात त्याचे म्हणनेही बरोबर होते त्याच्या दृष्टीने. (पण मी मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालया बाबत बोलत होता हे त्याच्या लक्ष

सेक्स एज्युकेशन अर्थात लैंगिक शिक्षण

आपल्या भारत देशात अनेक लैंगिक अपराध घडतात. काही उघडकीस येतात तर काहीजण बेआब्रु होईल म्हणुन प्रकरणं दाबले जातात. यांचं कारण शोधायला लागलो तर लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि त्याबाबतची उदासीनता या गोष्टींमुळे काही प्रमाणात आपण या गुन्ह्याना थांबवन्यात कमी पडत आहेत असे लक्षात येते. मध्यंतरीच्या काळात आपल्या शिक्षण विभागाने लैंगिक शिक्षण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही मंडळींना असले शिक्षण आपल्या पाल्यांना दिले तर त्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल, म्हणुन यावर नाराजी व्यक्त केली आणि लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न विफल ठरला. आपली भारतीय संस्कृती महान असुन कित्येक वर्षांपासूनची परंपरा आपल्याला लाभली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्र्चात्य देशांनी संशोधन करून त्यातील अनेक गोष्टी अंगीकारल्या आहेत मात्र आपण त्यांना आजही स्विकारत नाहीत त्यातीलच एक म्हणजे लैंगिकता. आपल्याकडे ३३ कोटी (प्रकारचे) देव आहेत. त्यात कामदेव आणि रती देवी हे लैंगिकतेचे देव आपल्याच पुराणातील आहेत तर कामसुत्र हा जगप्रसिद्ध ग्रंथ आपल्याच वात्सायन ऋषींनी लिहीलेला आहे

मावळे फसले गणीमी काव्यात

Image

स्वराज्याचे खरे शत्रु कोण?

Image

कुरूप बदकाचं पिल्लु?

Image
परवाच दहावीचा निकाल जाहीर झाला.अनेकजण भरघोस टक्के मार्क घेऊन पास झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे कौतुक व्हायलाच हवे ! यात दुमत नाही मात्र याचवेळी कमी मार्क घेणारांना घरच्यांसह शेजाऱ्यांचे व पाहुण्यांचे टोमणे सहन करावे लागत आहेत. या टोमण्यांमुळे मात्र या विद्यार्थ्यांची पुरती पंचायत होत आहे.टक्केवारी चांगली आहे पण त्याच्या किंवा तिच्या एवढी का नाही म्हणुन पालक मुला-मुलींना दुखावत असल्याने कित्येक विद्यार्थी स्वत : ला कोसताना पहावयास मिळत आहेत.मला या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे.ती गोष्ट आहे एका कुरूप बदकाच्या पिलाची.             एका बदकाला चार पिल्लं होतात त्यातील तीन पिलं अगदी छान दिसत असतात, मात्र चौथे पिल्लु जरा कुरूप दिसत असते.ते कुरूप दिसत असल्यामुळे त्याची तीन्ही भावंड त्याला कुरूप म्हणुन चिडवत असतात. खेळायला जायचे असल्यास ते भावंड त्याला सोबत घेत नसत व त्याला दिसण्यावरून त्याला सतत चिडवत असत. त्यांचे पाहुन इतर प्राणी देखील त्या पिलाला चिडवायला लागतात. त्यांच्या त्या   चिडवण्यामुळे ते पिल्लु पुरतं खचुन जातं.